Three important tools that are essential for online learning

 ऑनलाईन शिक्षण घेताना आपल्या पाल्यांची सुरक्षितता ही सर्वप्रथम गरज यासाठी या उपकरणांचा समावेश जरुर करा.



ऑनलाईन शिक्षणासाठी पालकांचा मोबाईल, लॅपटॉप कायम व्यस्त ठवणे पालकांना साहजिकच शक्य नाही. यासाठी पर्याय अनेक आहेत. त्यात लॅपटॉप, कॉम्प्यूटर याही पेक्षा सहज सुलभ अशी पुढील काही उपकरणे मुलांसाठी देता येतील जी आपल्याला खर्चिकदृष्ट्याही परवडणारी आहेत.

1) टॅब : 
   लिनोओ कंपनीचा टॅब फक्त 10,000 मध्ये उपलब्ध आहे. महागडा मोबाईल पेक्षा मुलांना टॅब दिला तर ते त्यांचे ऑनलाईन शिक्षण व्यवस्थित घेवू शकतील. हा टॅब कायम हातात धरुन ठेवावा लागत नसलेने त्यांचा हात ही भरुन येणार नाही. तसेच टॅब हा कोठेही मुलांना जिथे सोईचे वाटेल तिथे ती घेवून जावू शकतात.

अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा लेनोवो टॅब एम 8 एचडी (2 जीबी, 32 जीबी, वायफाय)

लिनोओ कंपनीचा लेनोवो टॅब एम 10 एचडी (2 जीबी, 32 जीबी, वायफाय) हा टॅब देखील ऑनलाईन शिक्षणासाठी सर्वोत्तम पर्याय ठरु शकतो


2) पॉवरबॅंक : ऑनलाईन शिक्षण चालू असलेने वापरात असलेली उपकरणे चार्जिंग करुन ठेवणे गरजेच बनते यामध्ये या उपकरणांचे चार्जिंगही कमी होत राहते यासाठी आपण कायम प्लगमध्ये चार्जिंग पॉइंट घालून बसलो तर या उपकरणांवर तसेच प्लगवरही अधिक भार येवून ती लवकर खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
यासाठी आपण पॉ़वरबॅकचा वापर करु शकतो. पॉवरबॅंक वापरात आणली तर घरातील प्लग वर येणारा अतिरिक्त ताण कमी होईल तसेच सदरची उपकरणे कधीही कुठेही चार्ज करता येतील.

3) हेडफोन : ऑनलाईन शिक्षण घेताना मुलांना मोबाईलचा साधा हेडफोन वापरु देवू नका तर हा या प्रकारचा माईक असलेला हेडफोन वापरा. टॅब, मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉवर साठी साधा हेडफोन सतत वापरावा लागत असल्याने मुलांच्या कानाला तसेच ऐकण्याच्या क्षमतेला प्रॉब्लेम येवू शकतो हा एक ऑनलाईन शिक्षणाचा तोटाही म्हणावा लागेल यासाठी सर्वात महत्वाचा आहे तो चांगला हेडफोन तोही माईक सिस्टीम असलेला
ब्लूटुथ सिस्टीम असलेला डिजीटेक चा डिजीटेक ब्लूटूथ हेडफोन (डीबीएच 006) किंमत फक्त 700 हा हेडफोन देखील एक उत्तम निवड होऊ शकते.


Coronil | Coronavirus medicine kit | stop Criticized


योग गुरु रामदेव बाबा यांना कोरोनिल हे कोरोनायुद्धात शस्त्र म्हणून आणले आणि त्यावर काही जणांचा टिकेचा भडिमार चालू झाला. तस पाहिल तर आपल्या आयुर्वेदात प्रत्येक आजारवर उपाय आहे हे आपल्यालाही चांगलच माहिती आहे. रामदेव बाबा यांनी आयुर्वेदाचा आधार घेऊन भारतीय उत्पादने बाजार आणली तेव्हा पासून भल्या भल्या कंपन्यांच धाब दणाणले आहे. टुथपेस्ट म्हटली की कोलगेटच ही संकल्पना रामदेव बाबा यांच्या दंतकाती मूळे बदलली आणी कोलगेटला आयुर्वेदिक पेस्ट करण्यास भाग पडले. अशी अनेक उदाहरण देत येतील. अनेक परकिय कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत धक्का बसू लागला. आपल्या भारतीय लोकांची मानसिकता अशी आहे की आपण आपल्याच लोकांच ऐकत नाही. रिलायन्सच्या जिओ बाबत असो किंवा सुशांतसिंग चे आत्महत्या प्रकरण असो. आपण विश्वासच ठेवू शकत नाही की आपण काही चांगलही करु शकतो. आपल्याकडे तेवढी क्षमता बुद्धीमत्ता आहे (उगाच नाही भारतीय सुंदर पिचाई गुगल सारख्या कंपनीचा सीईओ झाला). 
रामदेव बाबा यांचे औषधाला काय हरकत आहे पाठिंबा द्यायला हो आपल्याला. अशीही लोक मरत आहेत ते औषध घेवून तर पाहा मरणार तर नाहीतच कारण ते आयुर्वेदिक असणार. 
जर डब्लू एच ओ, अमेरिका, इंग्लड, चीन यासारख्या कंपन्यानी सांगितल तर आपण विश्वास ठेवू कारण काय ते हुशार आणि शिकलेले. भारतीय लोकांचा बाहेरील देशांवर दांडगा विश्वास पण भारतातील लोकांवर तेवढा का नाही. याच भारतीय वृत्तीमुळे ब्रिटीशांना भारतावर 150 वर्षे राज्य करणे सहज शक्य झाले. परकिय देशातील कंपन्यासाठी पायघड्या घातल्या जातात पण देशात एखादा उद्योग उभा राहत असेल तर त्याला लाल फितीत असे काही अडकवले जाते की उद्योगच नको अशी मानसिकता करुन बसतो.
रामदेव बाबा यांचे औषध गोररगरीब जनतेसाठी रामबाण ठरुही शकते. त्याला किमान साथू तरी द्यावी लागेल. नाही चालले तर एक प्रयत्न म्हणून तरी पाहायला काय हरकत नसावी. जशी देशाची अर्थव्यवस्था सुधारावी म्हणून दारु विक्री जर होऊ शकते तर प्रयत्न करणा-याला साथ देणे यात गैर ते काय???

आपल्या भारतीय लोकांच्या कौशल्यावर, बुद्धीमत्तेवर विश्वास ठेवायला शिका जी काय श्रेष्ठच आहे.

Satara (Maharashtra) and Corona






सातारा आणि कोरोना : 
सातारा हे तस पाहिल तर पश्चिम महाराष्ट्र मधील अतिशय शांत शहर, जिल्हा ही. कुठे चीन मधील रोग भारतात आला मग पुण्यात मग मुंबई मध्ये. तेव्हा सातारकरांना वाटले हा रोग आपलेकडे येणे अशक्यच. 

पहिले दोन रुग्ण विदेशी दौरा करुन आलेले त्यातील एक जण इतर व्याधींमूळे पूर्ण बरा होऊन देखील दुर्देवाने मृत्युमुखी पडला तर दुसरा पूर्ण बरा झाला. तेव्हा पासून सातारा हा या रोगापासून किरकोळ सावध झाला.

 मुंबई नाशिक पुणे येथून येणारे बांधवानी जेव्हा प्रामुख्याने जावली कराड या तालुक्यातून धक्के द्यायला सुरवात केली तेव्हा सातारकरांनी डोळे किलकिले करुन या रोगाची पाहणी केली. तो पर्यंत हरी ओम शांति.

 प्रशासन एकिकडे जीवाचं रान करत होते दुसरीकडे सातारकर भाजीपाला, कास सफर, सकाळ रात्रि पाय मोकळे करणे यात मग्न होते. जशी जिल्हा बंदी शिथील झाली आणि मुंबई पुणे कर येवू लागले त्यातील काही जण रोगयुक्त सापडू लागले तेव्हा मात्र शांत सातारकर अशांत झाले. कावरेबावरे झाले.

 आज पावेतो कोणत्याही संकटाला सामोरे न गेलेले किंबहुना तशी परिस्थिति ही निर्माण न झाली नसलेने सातारकर या संकटाला मात्र पूरते घाबरले ... घाबरले का... नाही हो छ्या.... घाबरेल तो सातारकर कसला... जशी दारु खुली झाली तसा घरात थोडासा गुपचूप बसलेला सातारकर खुला झाला च्या मायला त्या कोरोनाच्या मनात चार पाच शिव्या हासडून बाहेर पडला. नंतर हळू हळू सरकारनेही काही अंशी शिथिलता आणली आणि छोटासा सातारा गर्दी ने फुलून गेला.

 रुग्ण वाढत आहेत काही जण वेळेत न आल्याने तसच इतर कठिन व्याधी असल्याने दुर्देवाने मृत्युमुखी पडत आहेत पण बरे होण्याचे प्रमाणही वाढते आहे. सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राच्या निर्णयामूळ सातारकर सुखावला. आजवर सातारा मध्ये सातशे च्या वर रुग्ण आहेत. 

कोरोना केअर सेंटर, सातारा सर्व साधारण रुग्णालय, कराड मधील सह्याद्री हॉस्पिटल तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज यासारखी कोरोना योद्धा केंद्र जीवाच रान करुन कोरोना मुक्तीसाठी अहोरात्र काम करत आहेत. नावाला साजेस काम करत आहेत. सातारा जिल्हा मधील प्रशासन हे निश्चितच सुरुवातीपासूनच अतिशय उत्तम रित्या त्यांची जबाबदारी पार पाडत आहे हे समस्त सातारकराऩी पाहिले आहे. 

त्यांचा गौरव करायचा सोडून शहर नगर पालिका राजकारणात व्यस्त आहे हा भाग वेगळा... सातारकर वेळीच सावध झाल्याने समूह संसर्गापासून ते दूर राहीले हे सातारकरांचे यश मानावे लागेल. 

सध्या रुग्ण वाढीचा वेग मृत्यु दर बरे होणे चे प्रमाण याचा विचार करता बाहेरून  आलेला सातारा  मधील  हा कोरोना हा पाठशिवीचा खेळ खेळत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही