Coronil | Coronavirus medicine kit | stop Criticized


योग गुरु रामदेव बाबा यांना कोरोनिल हे कोरोनायुद्धात शस्त्र म्हणून आणले आणि त्यावर काही जणांचा टिकेचा भडिमार चालू झाला. तस पाहिल तर आपल्या आयुर्वेदात प्रत्येक आजारवर उपाय आहे हे आपल्यालाही चांगलच माहिती आहे. रामदेव बाबा यांनी आयुर्वेदाचा आधार घेऊन भारतीय उत्पादने बाजार आणली तेव्हा पासून भल्या भल्या कंपन्यांच धाब दणाणले आहे. टुथपेस्ट म्हटली की कोलगेटच ही संकल्पना रामदेव बाबा यांच्या दंतकाती मूळे बदलली आणी कोलगेटला आयुर्वेदिक पेस्ट करण्यास भाग पडले. अशी अनेक उदाहरण देत येतील. अनेक परकिय कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत धक्का बसू लागला. आपल्या भारतीय लोकांची मानसिकता अशी आहे की आपण आपल्याच लोकांच ऐकत नाही. रिलायन्सच्या जिओ बाबत असो किंवा सुशांतसिंग चे आत्महत्या प्रकरण असो. आपण विश्वासच ठेवू शकत नाही की आपण काही चांगलही करु शकतो. आपल्याकडे तेवढी क्षमता बुद्धीमत्ता आहे (उगाच नाही भारतीय सुंदर पिचाई गुगल सारख्या कंपनीचा सीईओ झाला). 
रामदेव बाबा यांचे औषधाला काय हरकत आहे पाठिंबा द्यायला हो आपल्याला. अशीही लोक मरत आहेत ते औषध घेवून तर पाहा मरणार तर नाहीतच कारण ते आयुर्वेदिक असणार. 
जर डब्लू एच ओ, अमेरिका, इंग्लड, चीन यासारख्या कंपन्यानी सांगितल तर आपण विश्वास ठेवू कारण काय ते हुशार आणि शिकलेले. भारतीय लोकांचा बाहेरील देशांवर दांडगा विश्वास पण भारतातील लोकांवर तेवढा का नाही. याच भारतीय वृत्तीमुळे ब्रिटीशांना भारतावर 150 वर्षे राज्य करणे सहज शक्य झाले. परकिय देशातील कंपन्यासाठी पायघड्या घातल्या जातात पण देशात एखादा उद्योग उभा राहत असेल तर त्याला लाल फितीत असे काही अडकवले जाते की उद्योगच नको अशी मानसिकता करुन बसतो.
रामदेव बाबा यांचे औषध गोररगरीब जनतेसाठी रामबाण ठरुही शकते. त्याला किमान साथू तरी द्यावी लागेल. नाही चालले तर एक प्रयत्न म्हणून तरी पाहायला काय हरकत नसावी. जशी देशाची अर्थव्यवस्था सुधारावी म्हणून दारु विक्री जर होऊ शकते तर प्रयत्न करणा-याला साथ देणे यात गैर ते काय???

आपल्या भारतीय लोकांच्या कौशल्यावर, बुद्धीमत्तेवर विश्वास ठेवायला शिका जी काय श्रेष्ठच आहे.

No comments:

Post a Comment